टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी राखीव खेळाडू का नाही? बीसीसीआय सचिवांनी सांगितलं कारण

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला दीड महिन्यांचा अवधी शिल्लक असताना टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्य संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकपसाठी हा संघ निवडला गेला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पत्रकार परिषदेत संघातील खेळाडूंची नावं वाचून दाखवली. पण यावेळी संघ घोषित करताना राखीव खेळाडूंची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुले अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तीन राखीव खेळाडू ठेवले होते. मात्र यावेळी फक्त 15 जणांचा स्क्वॉड घोषित करण्यात आला आहे. एखादा खेळाडू जखमी किंवा काही प्रॉब्लेम आल्यास बॅकअप असावा. ऐनवेळी खेळाडूची शोधाशोध नको म्हणून त्यांची निवड केली जाते. पण यावेळी तसं करणं टाळलं. पण या मागचं कारण देवजीत सैकिया यांनी नंतर स्पष्ट केलं.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button